श्री संत दामाजीपंत हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. वारकरी सांपदायात त्यांना मानाचे स्थान आहे. दामाजीपंतानी दुर्गादेवीच्या दुष्काळात लोकांना खायला अन्न मिळत नव्हते त्यावेळेस दामाजीपंत यांनी सर्वांना मदतीचा हात देत होते. प्रसंगाचे गांभीर्य जाणून सरकारी धान्याचं कोठार लोकांना लुटायला विठु महाराला सांगितले व पंताच्या आग्रहावरून तशी दवंडी देऊन लोकांना गंगा व यमुना नावाची धान्याची कोठारे लुटली यावेळी दामाजीपंत तत्कालीन तहसीलदार होते. ही खबर बादशहाला मिळतात पंतांना बिदरला नेण्यासाठी शिपाई आले होते. पण दामाजीपंताच्या आग्रहाखातर पहिल्यांदा विठ्ठल दर्शन घेऊन ते बिदरला निघाले. पण त्यावेळेस पांडुरंगाने विठू महाराचे रूप घेऊन बादशहाच्या दरबारात लुटलेल्या धान्याचे दाम देण्यासाठी आलो आहे असे सांगून मोहराचा पाऊस पाडला. ही गोष्ट दामाजीपंताला माहीत नव्हती. पण दरबारात गेल्यानंतर बादशहा म्हणाले तुमचा विठू महार येऊन धान्याचे दाम देऊन गेला.त्यावेळेस दामाजीपंत समजले विठु महार नसुन खुद्द भगवंतानेच हे दाम भरले आहे. अशी भगवंताची अपार लिला पाहून बादशहाने सुध्दा दामाजीपंताना सन्मानाने वागविले.
अशा दामाजीपंताचे मंदीर पंढरपूर येथे संभाजी चौकात आहे. कै. किसनलाल काकाणी यांनी अपार कष्ट सोसून या मंदीराची उभारणी केली. सध्या अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, व्यवस्थापक आनंद जावळे हे येथील मठातील सोयी सुविधा उपलब्ध करून देत असतात.

Post a Comment