शासनाने मागील ५० दिवसाहून प्रादुर्भाव नसलेल्या भागांत उद्योगधंदे सुरू करावेत-आ.परिचारक

पंढरपूर : गोरगरीब जनतेमध्ये लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर आर्थिक सुलभता आणणेसाठी ललॉकडाऊन ४ जाहीर करताना सोलापूर जिल्ह्यात ज्या भागात कोरोना प्रा्दभाव मागील ५०-५५ दिवसापासून आढळून आला नाही अशा भागामध्ये शासनस्तरावर नियोजन करताना शिथीलता देवून १८ मे पासून किमान सकाळी १० ते ५ पर्यंत सर्वच प्रकारचे उद्योगधंदे सोशल डिस्टन्सचा वापर करून सुरू करणेसाठी
परवानगी देणेबाबतची मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी पंतप्रधान महोदय व मुख्यमंत्री मा.नामदार श्री.उध्दबजी ठाकरेसाहेब यांचेकडे केली आहे.

केंद्र ब राज्य शासनाने कोरोना प्रार्दुभाव रोखणेसाठी जाहीर केलेले लॉकडाऊन ३ दि.१७/५/२०२० रोजी संपत आहे. आत्ताचे परिस्थितीनुसार त्लॉकडाऊन ४ जाहीर करणेबाबत शासनाने यापुर्वीच सुचित केले आहे. प्रामुख्याने मोठ्या शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव दिसून येतो, परंतु ग्रामीण भागात याचा प्रार्दभाव बहुतांशी दिसून येत नाही.

सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव आहे, परंतु सोलापूर ग्रामीण भागात लॉकडाऊन जाहीर झालेपासून ५०-५५ दिवस अतिशय कडकपणे नियमांची अंमलबजावणी जनतेने प्रामाणिकपणे केली असल्यामुळे हा भाग कोरोना मुक्त आहे. या पार्श्वभूमीवर
लॉकडाऊन ४ जाहीर करताना या ग्रामीण भागातील उद्योगधंदे सोशल डिस्टन्सचा बापर करून सुरू करणेचे नियोजन करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील दुकाने किमान दिवासातून ६ ते ८ तास नियमीत उघडावेत, जेणेकरून दैनंदिन कामकाज करून हातावर पोट आहेत असे सर्वसामान्य मजूर, दुकान कामगार, हातगाडेवाले अशा लोकांना आर्थिक अडचणींना तोंड देता येईल. अशा प्रकारची ग्रामीण भागातील जनतेतर्फे मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी पंतप्रधान महोदय व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.नामदार श्री.उध्दबजी ठाकरेसाहेब यांचेकडे केली आहे.
     किमान ग्रामीण भागात उद्योगधंदे सुरू झाल्यास तेथील जनतेला आर्थिक स्थैर्य मिळण्यास सुरूवात होईल.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget