अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणार्‍या नागरिकांवर कार्यवाही 150 गाड्या जप्त : सागर कवडे

पंढरपूर :  संचारबंदी व लॉगडाऊन असताना शहरात विनाकारण नागरीक फिरताना दिसत आहेत. त्यातच कोरोनाचे रुग्ण राज्यभरात वाढत असल्यामुळे आता पोलीस दल अधिक सतर्क झाले आहे. प्रत्येक नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होऊ लागली आहे. पंढरपूर शहरात व आजुबाजुच्या परिसरामध्ये वाहनांची वर्दळ वाढलेली होती. घरात राहणे अत्यावश्यक असताना बाजारपेठ व शहरी भागात गाड्यांची वर्दळ वाढली होती. त्यामुळे आज पंढरपूर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत थेट कारवाई ला सुरुवात केली आहे.

        पंढरपूरात आंबेडकर पुतळा येथे नाकाबंदी करण्यात आली या मध्ये 150   वाहने मोटार वाहन कायदा 207 अन्वये पोलीस स्टेशन ला जप्त करण्यात आलेली आहेत. जप्त केलेली सर्व वाहने न्यायालयत सादर केली जातील व त्या नंतरच योग्य ती कारवाई करून ती नागरीकांना ताब्यात मिळतील अशी माहिती डी.वाय.एस.पी श्री.सागर कवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
       वैद्यकिय कारणासाठी बाहेर पडत असणार्‍या नागरिकांना दवाखान्यात पोहचवण्याची सोय ही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आल्याचे सांगीतले. काही नागरीक अत्यावश्यक पासचा दुरूपयोग करून इतर नागरिकांच्या गाडी मध्ये इंधन भरून देतात असे दिसून आल्याचे सांगीतले त्यामुळे वाहनांना पेट्रोल देताना ज्या नागरिकाला पास दिला गेला आहे. तो त्याच्याच गाडीत पेट्रोल भरतोय का या गोष्टींची खातरजमा केल्यानंतरच इंधन देत आहोत हे ही श्री.सागर कवडे यांनी नमुद केले. 
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget